वर…बापांनो मुलांचं लग्न करताय तर शुभमंगल !! सावधान !!

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी:गणेश गुप्ते इंदापूर ग्रामीण

पुणे जिल्ह्यात लग्न जमवणारी टोळी सक्रिय झाली आहे.ही टोळी मुलाचे लग्न जमवण्याच्या हेतूने अनेक मुलांच्या वडिलांची व मुलाची फसवणूक करत आहेत.
सध्या ग्रामीण भागांमध्ये अनेक मुलं लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.याचाच फायदा घेत पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील ही टोळी सक्रिय आहे.मात्र लग्न जमवण्यासाठी या टोळीमध्ये महिलेचा समावेश असतो.मात्र यामध्ये महिला असल्याने अनेक तक्रारदार तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे जात नाही.

मात्र एखाद्या घरी मुलगा असेल अशा मुलाच्या घरी एक पुरुष आणि एक स्त्री जाते. त्या ठिकाणची पाहणी करते , घर कसे आहे, मुलगा काय करतो, शेतजमीन किती असे प्रश्न या टोळीकडून विचारले जाते.यानंतर विषय येतो तो पैशांवरती पहिल्यावेळी विशिष्ट रक्कम ठरली जाते.त्यानंतर एखादा बायोडाटा आणि एक फोटो व्हाट्सअप वरती नवरदेवाला पाठवला जातो.त्यानंतर काही कालावधीनंतर मुलीला मुलगा पास नाही असे कारण पुढे केले जाते. अजून थोडे पैसे द्या अजून आपण स्थळ पाहू असे म्हणून पुन्हा त्यांच्याकडून पैसे उकळले जातात.सध्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या वरती देखील अनेक मुलींचे फेक बायोडाटा आणि फेक फोटो टाकले जात आहेत. आणि याचाच फायदा घेत हि टोळी अनेकांना गंडा घालत आहेत.

मुलांचे वय निघून जात असल्याचे पाहत मुलाकडचे देखील पैशाचा विचार न करता या आमिशाला बळी पडतात.एका प्रकारे हा गोरख धंदा सध्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील सुरू आहे. मात्र यामुळे मुलांकडील मंडळी जाम वैतागले असून एकीकडे मुलाचे लग्न होत नाही तर दुसरीकडे फसवणूक होत आहे. त्यामुळे काय करावे असा प्रश्न मुलांच्या वडिलांना पडला आहे? पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये असे फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत असून हे प्रकार वेळीच रोखणे गरजेचे असल्याचे मत मुलांच्या वडिलांकडून होत असून अशा टोळ्या जेरबंद कराव्यात अन्यथा याची व्याप्ती खूप मोठी होईल आणि अनेक लोकांची यामध्ये फसवणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button