इंदापूर येथील बेकायदेशीरपणे भिशी सुरू करून १९ कोटी ६२ लाख ३८ हजार रुपये फसवणूक केल्या प्रकरणात जामीन मंजूर

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण

इंदापूर : संगतमताने कट करून भिशीच्या माध्यमातून योजना आखून व रोख  स्वरूपात रक्कम गोळा करून दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून भिशी धारक यांना विश्वासात घेऊन जमलेले पैशाचे आर्थिक फसवणूक केली म्हणून उत्तम मारुती बंडगर व शंकर मारुती बंडगर यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर झाला होता.

१९ कोटी ६२ लाख ३८ हजार रुपये फसवणूक केल्या प्रकरणात आरोपी यांनी ॲड अर्जुन वाघमारे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता ॲड अर्जुन वाघमारे यांनी असा युक्तिवाद केला की  ते निर्दोष आहेत आणि आरोपपत्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. एफआयआर दाखल करण्यात अस्पष्ट विलंब झालं आहे. माहिती देणाऱ्याने आणि इतर गुंतवणूकदार त्यांना दिलेल्या देयकाबद्दल कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. कोणतीही रोख रकमे इतकी मोठी गुंतवणूक करणार नाही. माहिती देणाऱ्याने आणि गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे एवढी मोठी रोख रक्कम असल्याचे दाखविण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा नाही.

त्यांनी कधीही  मोठी रक्कम स्वीकारली नाही आणि कधीही आश्वासन दिले नाही.ते दुप्पट परत करावे. ज्या कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे त्या कायद्याच्या तरतुदी त्यांना लागू नाहीत. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे आणि आता आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे आणि त्यामुळे त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करणे अनुचित आहे न्यायालयाने ॲड अर्जुन वाघमारे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button