श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या जागेची हद्द निश्चित; चेअरमन पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत खांब रोवण्याचे काम पूर्ण

Spread the love
लोकशासनगणेश गुप्ते, उपसंपादक
भवानीनगर: (१६)श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर परिसरातील कारखान्याच्या मालकीच्या जागेचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मालकीच्या जागेच्या हद्दी निश्चित करून, त्या ठिकाणी खुणा करण्यात आल्या व सिमेंटचे खांब (पोल)रोवण्यात आले. या मोहिमेवेळी कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक स्वतः उपस्थित होते.

गेल्या काही काळापासून कारखान्याच्या काही जागांच्या सीमांबाबत स्पष्टता आणणे आवश्यक होते. भविष्यातील विस्तार आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव, कारखाना प्रशासनाने अधिकृत मोजणीनुसार हद्दी निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार
कारखान्याच्या मालकीच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले.

निश्चित केलेल्या सीमांवर अधिकृत खुणा करण्यात आल्या.
हद्दीचे उल्लंघन होऊ नये म्हणून तातडीने खांब रोवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यावेळी बोलताना चेअरमन पृथ्वीराज जाचक म्हणाले की, “कारखान्याची मालमत्ता ही सभासदांची आणि संस्थेची महत्त्वाची संपत्ती आहे. या जागेचे संरक्षण करणे आणि तिचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. या प्रक्रियेमुळे कारखान्याच्या जागेवर होणारी संभाव्य अतिक्रमणे रोखण्यास मदत होईल.”

याप्रसंगी कारखान्याचे संचालक तानाजी निंबाळकर,सागर निंबाळकर , किशोर भोईटे,दराडे साहेब, चांदगुडे साहेब,अन्य संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेमुळे कारखान्याच्या परिसरात प्रशासकीय शिस्त आणि मालमत्तेचे संरक्षण अधिक मजबूत होणार असल्याचे मत चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button