समाजाने एकत्र येऊन हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरून लढावे लागेल: डॉ.अनुपम बेगीमेहतर

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी:शंकर जोग,पुणे

पुणे : वाल्मिकी समाज, रुखी समाज आणि सफाई मजदूर यांची प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक कॅम्प येथील वीर गोगादेव समाज मंदिर स्वर्गीय वसंतराव चव्हाण मेमोरियल हॉलमध्ये आयोजित बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन दादा जोशी, या बैठकीच्या आयोजक अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संस्थापक अध्यक्ष डॉ.अनुपम बेगी, कविराज संघेलिया, मनोज लालबिगे, परविन लालबिगे, सतीश लालबिगे, रवी भिंगानिया, यश चव्हाण, भारत जाधव, गोपाल सोलंकी, जीवन द्याल, महेंद्र चव्हाण, विपुल उमंदे, अमृतपाल डिक्की, शारदा सोडी, किशोर भगत, सौरभ वाल्मिकी, मंथन म्हेत्रे, सूर्यकांत यादव, विलास मकवाणी, गीता ननावरे,नितीन प्रसाद, रवी भोंगळे, मनोज तूसंबड, आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ अनुपम बेगी यांनी सांगितले केंद्रामध्ये, महाराष्ट्रात, तसेच अनेक राज्यातील महापालिकांमध्ये मेहतर वाल्मिकी समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उचलण्यासाठी प्रतिनिधीत्व करण्यासाठी समाजातील एकही मान्यवर नाही त्यासाठी समाजाने एकत्र येऊन हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरून लढवावी लागेल असे यावेळी सांगितले.

याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली तसेच माजीआमदार मोहनदादा जोशी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button