इंदापूर मध्ये राष्ट्र सेवा दलाचा ८४ वा वर्धापन दिन संपन्न !

Spread the love

लोकशासन – उपसंपादक : शिवाजी पवार

राष्ट्र सेवा दलाचा ८४ वा वर्धापन दिन संपन्न झाला इंदापूर तालुका प्रतिनिधी पुणे जिल्हा संघटक कैलास कदम यांच्या निवासस्थानी कार्यक्रम हा संपन्न झाला .राष्ट्र सेवा दल ही एक प्रमुख स्वयंसेवी संघटना आहे, जी युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता आणि विज्ञानाभिमुखता यांचे मूल्य शिकवण्यासाठी कार्यरत आहे.

या संघटनेची स्थापना १९२३ मध्ये झाली, जेव्हा नागपूर येथील ध्वज सत्याग्रहादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली होती. या आंदोलनात हुबळी सेवा मंडळाचे संस्थापक ना. स. हर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी तुरुंगात माफी न मागता स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा दिली. यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे लक्ष वेधले गेले आणि एक स्वयंसेवी संघटना स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. १९२३ मध्ये काकीनाडा येथील काँग्रेस अधिवेशनात याबाबत चर्चा झाली.दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान (१९३९-१९४५) स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली, परंतु त्याचव.mac वेळी सांप्रदायिक विचारांच्या संघटनांचा प्रभाव वाढत होता. या पार्श्वभूमीवर, वि. म. हर्डीकर, शिरूभाऊ लिमये, ना. ग. गोरे आणि साने गुरुजी यांनी ४ जून १९४१ रोजी पुणे येथे तरुणांचे शिबिर आयोजित करून राष्ट्र सेवा दलाची पुनर्घटना केली. याचा उद्देश जातिधर्मातीत राष्ट्रवादाचा प्रसार आणि स्वातंत्र्य चळवळीला बळ देणे हा होत.

१९४७ मध्ये सातारा येथे राष्ट्र सेवा दलाचा भव्य मेळावा झाला, ज्यामध्ये १२००० युवक-युवतींनी सहभाग घेतला. आझाद हिंद सेनेचे कॅप्टन शाहनवाज खान या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटले की सेवा दलाचे नियंत्रण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घ्यावे, परंतु सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वायत्तता राखण्याचा निर्णय घेतला.

१९४८ मध्ये सेवा दलाने काँग्रेसशी संघटनात्मक संबंध तोडले आणि स्वतंत्रपणे समाजवादी मूल्ये आणि विधायक कार्याला प्रोत्साहन देण्याचे ध्येय स्वीकारले.राष्ट्र सेवा दलाचे मुख्य कार्य खालीलप्रमाणे आहे.राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समतेची शिकवण देणे.स्वातंत्र्य चळवळीत योगदान स्वातंत्र्यलढ्यात सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी भूमिगत चळवळीत आणि गावागावांत संपर्क वाढवून महत्त्वाची भूमिका बजावली.स्त्री-पुरुष सहकार्य सेवा दलाने सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुषांच्या सहकार्याला प्रोत्साहन दिले.

अनेक महिला कार्यकर्त्यांनी संघटना बांधणीत मोलाची कामगिरी केली.पर्यावरण आणि सामाजिक कार्य १९६२ मध्ये घटनादुरुस्ती करून सभासद नोंदणी आणि अंतर्गत निवडणुका सुरू झाल्या. १९६७ पासून सेवा दलाचे कार्य उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर आदी राज्यांमध्ये विस्तारले. पर्यावरण संरक्षण, शिक्षण आणि सामाजिक जागृती यांसारख्या विधायक कार्यांवर भर देत आहेत.स्वायत्तता आणि समाजवाद सेवा दलाने काँग्रेसपासून स्वायत्तता राखली आणि समाजवादी शीलाचे नागरिक तयार करणे, तसेच निष्ठावान आणि कार्यक्षम कार्यकर्ते निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवले. विस्तार १९६७ पासून सेवा दलाचे कार्य देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरले आहे.

स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका सेवा दलाने स्वातंत्र्य चळवळीत सैनिक तयार करण्याचे आणि आंदोलनांना पाठबळ देण्याची व महत्त्वाचे काम करण्याची भूमिका घेतली आहे.राष्ट्र सेवा दलाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या सामाजिक आणि राजकीय विकासात मोलाचे योगदान दिले आहे. आजही ही संघटना युवकांना प्रेरणा देणे आणि सामाजिक कार्यात सहभागी करणे यासाठी कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button