
लोकशासन- उपसंपादक : गणेश गुप्ते
इंदापूर : दि. १८ राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबवली जाते मात्र याच योजनेचे वेतन घेण्यासाठी लाभार्थ्यांना ”मोठे दिव्य पार” करावे लागत असल्याची चर्चा लाभार्थ्यांमध्ये आहे.
”ना घर का ना घाट का”अशी अवस्था लाभार्थ्यांची झाली आहे.
यामध्ये हजारो ज्येष्ठ नागरिक अंध, अपंग, बहिरेपणा, अशिक्षित, यांचा समावेश आहे.
निराधार ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना वर्षातून एकदा एकदा हयातीचा दाखला देण्यासाठी भवानीनगर भागातून इंदापूर मध्ये चाळीस कि.मी. अंतर पार करून जावे लागते.मात्र निराधार असल्याने ग्रामीण भागातून इंदापूरला जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यातच राज्य शासनाने डिसेंबर २०२४ पासुन राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसाह्याचे वितरण डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) मार्फत करण्यात येत आहे.
यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे बँकेमध्ये लाभार्थ्यांना आधार कार्ड जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही अशी खंत निराधार,अपंग, व्यक्तींनी केली आहे.अशिक्षित, अपंग, बहिरेपणा असल्याने बँकेमध्ये गेल्या नंतर कोणत्याही प्रकारचे सहकार्य बँका करत नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
खातेदाराचे आधार कार्ड सेडिंग करण्याची जबाबदारी बँकांची असून बँका ही जबाबदारी झटकत आहेत.
व ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, अपंग, यांची ससेहोलपट होत आहे ही थांबणार का? असा सवाल लाभार्थी करत आहेत त्यातच हयातीचा दाखला देण्यासाठी इंदापूर येथे जावे लागत असल्याने लाभार्थ्यांच्या हाल होत आहेत. हिच सेवा प्रत्येक ग्रामपंचायत या ठिकाणी मिळावी अशी मागणी लाभार्थ्यां करत आहेत.