
लोकशासन- प्रतिनिधी:गणेश गुप्ते , इंदापूर ग्रामीण
इंदापुर : १४ सणसर येथील ओढ्याला गेल्या काही दिवसांपूर्वी पूर आला होता.
यापुरामध्ये वड्या शेजारील राहणाऱ्या अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले होते याचे पंचनामे देखील शासनाच्या वतीने करण्यात आले होते.
बारामती- इंदापूर मार्गावरती सणसर ओढ्यालगत स्वतःची शेती असणारे अनेक नागरिक राहत आहेत.
मात्र मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक घराचे नुकसान झाले .
हे रस्त्याचे काम कासव गतीने चालू असून हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे? आहे ह्या परिस्थितीमध्ये या ओढ्याला संरक्षण भिंती बांधण्यात याव्यात अशी मागणी ओढ्याच्या कडेला राहणाऱ्या ग्रामस्थांनी केली आहे.

सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झाले असून काही दिवसांपूर्वी पूर आला होता तशाच पद्धतीने सध्या पावसाच्या वातावरण आहे.अगोदर ओढ्याच्या कडेला संरक्षण भिंती बांधण्यात याव्यात व नंतर हे काम सुरू करण्यात यावे असी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.या ओढ्या लगत आता पर्यंतचे हि दुसरी घटना असून पुढील घटना तरी संबंधित विभागाने रोखण्यासाठी प्रयत्न करावेत व संरक्षण भिंती बांधून नंतर रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे.