
लोकशासन-उपसंपादक : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर : महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला असला तरी इंदापूर तालुक्यामध्ये या उलट चित्र पाहण्यास मिळत आहे. दि.(१३) जुन रोजी निंबोडी -भाग्यनगर रस्त्यावरील भाग्यनगर स्मशानभूमी जवळील एका बाभळीच्या झाडाला दोन बाहुल्या व टाचण्या लावुन खिळे ठोकण्यात आले होते.हा प्रकार काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर काही ग्रामस्थांनी बाहुल्या टाचण्या आणि खिळे काढुन टाकले.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ हा करण्यात आला आहे. हा कायदा समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि लोकांना संरक्षण देण्यासाठी बनवण्यात आला आहे. मात्र शासन अंधश्रद्धा जनजागृती करण्यासाठी कमी पडत असल्याची खंत काही नागरिकांनी उपस्थित केली आहे.इंदापूर तालुक्यामध्ये अंधश्रद्धा जनजागृती करण्यासाठी अनेक ग्रामपंचायती देखील अंधश्रद्धा जनजागृती करण्यासाठी कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत त्यामुळेच अंधश्रद्धा जास्त फोफावत असल्याचे मत काही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ . नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर शासनाने हा कायदा मंजूर केला.या कायद्यामध्ये शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे.जर कोणी या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते.यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर काळ्या जादूचा किंवा सैतानाचा प्रभाव असल्याचा आरोप करणे, न जन्मलेल्या मुलाचे लिंग बदलणे, किंवा भुत-प्रेत बाधा झाली आहे.असे सांगून लोकांना भिती दाखवणे, किंवा त्यांची फसवणूक करणे अशा गोष्टींना या कायद्याद्वारे प्रतिबंध घालण्यात आला आहे.
हा कायदा लोकांना सुरक्षित वाटावे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी बनवण्यात आला आहे. मात्र इंदापूर तालुक्यामधील अनेक ग्रामपंचायती याबाबत जनजागृती करण्यासाठी कमी पडत आहेत. याबाबत ग्रामपंचायती जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणार का? का हा कायदा कागदावरतीच राहणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.